मंचर -चिंचोली (ता. आंबेगाव) येथील श्री कपालेश्वर महाराज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत 192 बैलगाडे धावले. घाटाचा राजा म्हणून दत्तात्रय मारुती गायकवाड, तर फायनल सम्राट म्हणून कै. सखाराम किसन लोहोट यांनी बक्षीस जिंकले.
येथील नवीन घाटाचे उद्घाटन शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर, भाजपचे तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, भाजपचे ज्येष्ठ नेते भानुदास काळे, सरपंच विद्या कोकणे, उपसरपंच अरविंद दळे, समस्त ग्रामस्थ मंडळी अध्यक्ष अरुण कोकणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष विजय कोकणे, बबन कोकणे, खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय कोकणे, विलास कोकणे उपस्थित होते. प्रथम क्र.- खंडूशेठ सैद, द्वितीय क्र. – बाबाजी सैद, तृतीय क्र. – सखाराम घोडेकर, चतुर्थ क्र. – दादाभाऊ शिंदे यांना मिळाले.
सकाळी श्रींचा अभिषेक, पालखीची मिरवणूक आणि रात्री बहुरंगी महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. मंदिराचा कलशारोहण समारंभ पांडुरंग महाराज येवले यांच्या हस्ते पार पडला. बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण सरपंच विद्या कोकणे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
घाटाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भाजपचे संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, अरूण गिरे, कैलासबुवा काळे, देविदास दरेकर यांनी भेट दिली. नवीन घाटाला सहकार्य करणारे रामदास घोलप, विष्णु कोकणे, स्वप्निल कोकणे, दशरथ कोकणे, बबन कोकणे, नामदेव रोकडे, ज्ञानदेव कोकणे यांचा सत्कार करण्यात आला.