गाव बैठकीत एकमताने घेतला निर्णय
बेल्हे – अणे (ता. जुन्नर) पठारावरील पाणी समितीने अणे, पेमदरा, शिंदेवाडी व पठारावरील सर्व वाड्यांसाठी उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी फेरजल नियोजनामध्ये समावेश होत नाही तोपर्यंत शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
जोपर्यंत सकारात्मक निर्णय शासन घेत नाही, अणे पठार भागाचा जो पर्यंत कुकडी प्रकल्पच्या चौथ्या सुप्रीमात जो पर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 23) गावबैठकीत घेण्यात आला. या आधी असाच निर्णय नळवणे ग्रामस्थांनी शनिवार (दि. 20) झालेल्या गावबैठकीत घेतला आहे.
सध्या गावातील तरुण वर्ग जो आपल्याकडे शेती असून शेती सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे आपली माय भूमी सोडून पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी, व्यवसाय करावा लागतो. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी बैठकीत केली. या गावबैठकीस अजित शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुनिल शिंदे, पंढरीनाथ कडूस्कर, बाळासाहेब शिंदे, गंगाराम शिंदे, गणेश शिंदे, खंडू बेलकर, प्रदीप शिंदे, रोहिदास शिंदे, गोरख शिंदे,राजू निकम,धोंडिभाऊ शिंदे, माजी सरपंच एम. डी. पाटील शिंदे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.