आळंदी – इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायन युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. गेल्य दोन दिवसांपासून इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे पुणे फेसाळलेली आहे.
उगमापासून संगमापर्यंत इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण आणि नदीला आलेले फेसाळयुक्त पाणी या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिकार्यांनी इंद्रायणी नदी प्रवाहातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच प्रमुख ग्रामपंचायती यांना भेटी दिल्या होत्या.
(आळंदीतील इंद्रायणी नदीपात्रातील काळवंडलेल्या पाण्याची पाहणी केली. व कुबेर गंगा ओढ्यावर फायटोरीमेडीएशन तत्वावर उभारल्या जात असणार्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पास भेट देण्यात आली होती.) संपूर्ण मार्गावरील नदीप्रवाहास येऊन मिळणार्या सर्व प्रमुख सांडपाणी स्त्रोतांची पाहणी केली व माहिती घेतली होती. तसेच शहराच्या मलनि:सारण प्रकल्पांचा सद्यस्थितीत आढावा घेतला होता.
कुछ तो गडबड हैं
लवकरच नद्यांचे प्रदूषण कमी झालेले असेल, त्याबाबत तशा उपाययोजनाही सुरु आहेत, अशी माहिती मंडळाचे सदस्य तथा सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली होती; मात्र अधिकार्यांची पाठ फिरताच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. दरम्यान, अधिकारी येणार होते म्हणून दोन दिवस कंपन्यांना तंबी दिली होती का? कारण अधिकारी आले होते त्यावेळी पाणी एवढे प्रदूषित दिसत नव्हते त्यामुळे कुछ तो गडबड हैं म्हणायला वाव असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.
पाणी काळवंडलेले
सद्यस्थितीत इंद्रायणी नदीचे पाणी काळवंडलेले दिसून येत आहे. आळंदी येथील जुन्या बंधार्यातून ते पाणी नदीपात्रात पडल्यावर त्याचा बर्याचशा प्रमाणात पांढरा फेस तयार झाला आहे. तसेच त्या पांढर्या फेसावरती काळसरपणा आल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.