पुणे- सातगाव पठार (ता. आंबेगाव) या बटाट्याच्या आगारात गेल्या महिन्यापासून मुसळधार पावसामुळे येथील बटाटा पिकाचे जवळजवळ 80 टक्के नुकसान झाले. यात शेतकऱ्यांचे लाखे रुपयांचे नुकसान झाले असून खर्च केलेले भांडवलही निघाले नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित यामुळे बिघडले असून, यावर भरपाई हाच एकमेव उपाय आहे. ती कधी मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे.
सातगाव पठार भागात कुठेही जलसिंचन उपसा योजना नाही, लिफ्ट इरिगेशन सेवादेखील उपलब्ध नाही. पावसावर अवलंबून असलेले बटाटा पीक घेण्यात येथील शेतकरी प्राधान्य देतात. या भागात सुमारे साडेसहा हजार एकर शेतीक्षेत्रात बटाटा लागवड केली जाते. बटाटा लागवडीस एकरी 65 ते 70 हजार रुपये खर्च येतो. बटाटा काढणीनंतर त्याची आरणीत साठवणूक केली जाते;
मात्र सततच्या पावसाने निघालेला बटाटा आणि साठवलेला बटाटा दोन्हीही सडले आहेत. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून त्याचा अहवालही वरिष्ठांपर्यंत पोहाचला आहे. यावर त्वरीत कार्यवाही करून लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
आंबेगाव तालुक्यात पारगावतर्फे खेड, कुरवंडी, कोल्हारवाडी, निघोटवाडी, थुगाव, भावडी, कोरेगाव, पेठ आणि श्रीरामनगर या परिसरात बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागात जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही पाहणी केली आहे. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नुकसानीची तीव्रता लक्षात आल्याने भरपाईसाठी त्यांच्याकडून पाठपुरावा होणे अपेक्षित आहे.
गाळातील बटाट्यांचे नुकसान वेगळेच – 100 किलो बटाट्याच्या बियाणांची लागवड केली असेल तर 10 ते 12 पिशव्या (प्रति 55 ते 60 किलो) गळीत निघते. मात्र यावेळी हे प्रमाण घअले आहे. पावसामुळे घत्तलेल्या चिखलात बटाटे रुतून बसल्याने हे नुकसान वेगळेच असते. बटाटे काढण्यासाठी छोट्या लाकडी पट्टीचा उपयोग करूनच बटाटे काढावे लागत आहेत. यातील अर्धे बटाटे सडलेलेच असतात.
10 किलोला अवघा 170 रुपये भाव – सातगाव पठार भागात शेतकऱ्यांनी सरासरी 1 ते 10 एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड केली आहे. एका एकर बटाटा शेतीला 60 ते 65 हजार खर्च येतो. बियाणे, खते, औषधे, मजुरी, फवारणी, काढणी आदींसाठी मोठा खर्च येतो. सध्या शेतकऱ्याला प्रति 10 किलोस 170 रुपये खासगी कंपन्यांकडून दर मिळत आहे. उत्पादन घटल्याने या दरानेदेखील बटाटा विकणे परवडत नाही, यातून भांडवल खर्चही वसूल होणे अवघड आहे.
सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांनी सोसायटीचे कर्ज हप्ते वेळेवर भरले आहेत; मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप एक रुपयाही कर्ज हप्ता भरला नाही, त्यांचे कर्ज 100 टक्के माफ केले; पण ज्यांनी वेळेवर कर्ज हप्ते भरले त्यांच्या खात्यावर सरकारने एक रुपयाही जमा केला नाही. आता शेतकऱ्यांना तीन वेळा अतिपावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून त्यांच्या बॅंक खात्यावर तातडीने प्रतिएकरी पन्नास हजार रुपये जमा करावेत.
-सोपानराव नवले, भावडी सोसायटी, ता. आंबेगाव
या भागात गेल्या महिन्यापासून सातत्याने मुसळधार पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील बटाटा पीक काढता आलेले नाही, यामुळे शेतकऱ्याची अपरिमित हानी झाली असून, सातगाव पठार भागातील बटाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. सरकारने विशेष आर्थिक बाब म्हणून शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी.
-अशोक राक्षे, ग्रामपंचायत सदस्य, पेठ
सातगाव पठार भागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पिकासाठी खासगी सावकार, राष्ट्रीयकृत बॅंका, पतसंस्था सोसायट्यांकडून कर्ज घेतले होते. शेतकऱ्याचा बटाटा शेतातच सडलेला आहे. आपल्या मुला-मुलींची लग्न कशी करायची, राष्ट्रीयीकृत बॅंका-पतसंस्था यांच्याकडून घेतलेली पीककर्जे कशी फेडायची, याची चिंता पडली आहे. सरकारने विशेष आर्थिक बाब म्हणून शेतकऱ्यांना पीककर्ज, सोसायटी माफ कराव्यात.
-दिलीप पवळे, प्रगतशील शेतकरी, पेठ
गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने बटाटा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे केले असून, त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. वरून याची मंजूरी आल्यास त्यानुसार नुकसानभरपाईचे वाटप करण्यास सुरुवात केली जाईल.
-टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव
झालेल्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक, तलाठी, ग्रामसदस्य यांचे पथक तयार करण्यात आले होते. नऊ गावांमध्ये त्यांनी पंचनामे केले असून, अहवाल तलाठी कार्यालयाकडे पाठवला आहे. भरपाईबाबतचे सरकारी नियोजनाचे काम सुरू आहे.
-दीपक मडके, मंडळ अधिकारी, मंचर
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
आंबेगाव तालुक्यात पारगावतर्फे खेड, कुरवंडी, कोल्हारवाडी, निघोटवाडी, थुगाव, भावडी, कोरेगाव, पेठ आणि श्रीरामनगर या परिसरात बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागात जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही पाहणी केली आहे. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना नुकसानीची तीव्रता लक्षात आल्याने भरपाईसाठी त्यांच्याकडून पाठपुरावा होणे अपेक्षित आहे.
गाळातील बटाट्यांचे नुकसान वेगळेच – 100 किलो बटाट्याच्या बियाणांची लागवड केली असेल तर 10 ते 12 पिशव्या (प्रति 55 ते 60 किलो) गळीत निघते. मात्र यावेळी हे प्रमाण घअले आहे. पावसामुळे घत्तलेल्या चिखलात बटाटे रुतून बसल्याने हे नुकसान वेगळेच असते. बटाटे काढण्यासाठी छोट्या लाकडी पट्टीचा उपयोग करूनच बटाटे काढावे लागत आहेत. यातील अर्धे बटाटे सडलेलेच असतात.
10 किलोला अवघा 170 रुपये भाव – सातगाव पठार भागात शेतकऱ्यांनी सरासरी 1 ते 10 एकर शेती क्षेत्रात बटाटा लागवड केली आहे. एका एकर बटाटा शेतीला 60 ते 65 हजार खर्च येतो. बियाणे, खते, औषधे, मजुरी, फवारणी, काढणी आदींसाठी मोठा खर्च येतो. सध्या शेतकऱ्याला प्रति 10 किलोस 170 रुपये खासगी कंपन्यांकडून दर मिळत आहे. उत्पादन घटल्याने या दरानेदेखील बटाटा विकणे परवडत नाही, यातून भांडवल खर्चही वसूल होणे अवघड आहे.