पाण्याचे साधन असल्याने काही ठिकाणी पीक जोमात
वीसगाव खोरे – वीसगाव खोरे (ता. भोर) हे भात पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे भात पिकांचीही अनियमित वाढ झाली आहे.
भात पीक ओंबी पोसण्याच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाल्याने तांदळाचा उतारा कमी प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गरव्या भात पीक असलेल्या भाताची वाढ क्षमता 120 ते 130 दिवसांत होते. भात पिकाला मोहर येण्याच्या काळात पाऊस गायब झाल्याने भात पिके पळंजावर गेले असल्यामुळे यांचा परिणाम भात पिकांच्या उताऱ्यावर होणार आहे.
त्यामुळे तांदळाचा दर 20 ते 25 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात भात खाचरांना पाणी देण्याचे साधन म्हणजे काही ठिकाणी जिवंत पाण्याचा स्रोत आहे, अशा ठिकाणी भात पीक जोरावर आहे.
भोर तालुक्यातील वीसगाव खोरे हे तांदळाची आगार म्हणून ओळख आहे.नेमका भात पिकाच्या लोंब्या भरतेवेळी पाऊ स गायब झाल्याने भात खाचरात जमीनीला भेगा पडल्याने भाताचे लोंब्या न भरता पांजळावर गेल्या आहेत त्याचा परिणाम भाताचे पीक उत्पादनावर होणार आहे.
– गेनबा भिलारे, प्रगतशील शेतकरी (वरवडी डायमुख, ता. भोर)