सुपे – सुपे परिसरात सुपे पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक समाजाने सामाजिक सुलोखा राखण्याचे आवाहन सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वत्र समाजांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे. त्यामध्ये कुठलाही तेढ निर्माण होऊ नये तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी असे पाटील यांनी सांगितले. सुपे पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
पोलिसांनी सुपे गावातील मुख्य पेठेतून अधिकारी व पोलिसांच्या वतीने शांतता राखण्यासाठी रूट मार्च घेण्यात आला. यावेळी सरपंच तुषार हिरवे, दूध संघाचे संचालक सुशांत जगताप, माजी सभापती शौकत कोतवाल, सरपंच सुनील चौधरी, समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत, उपसरपंच दत्तात्रय वाबळे, अनिल हिरवे मोरगाव व सुपे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
—