जवळार्जुन – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जेजुरी येथील जननी तिर्थ या निमित्ताने हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते. जयाद्री मित्र परिवाराने येथे दीपोत्सावाचे आयोजन केले होते.
जयाद्री महात्म्य या ग्रंथात खंडोबा बाणाई विवाहानंतर क्रोधीत म्हाळसा येथे येऊन तप करू लागली. तेव्हा गंगा ही येथे आली. गणपती व नारद म्हाळसेचा शोध घेत या ठिकाणी पोहचल्यावर म्हाळसा जलरूप होऊन गंगेत विलीन झाली. पण नारदांनी तिला ओळखले. गंगा व म्हाळसा दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जेथे तप केले.
तेथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाणास जननी तीर्थ नाव दिले, असे या ठिकाणाचे महात्म्य वर्णन केले आहे. हे मंदिर जानुबाई मंदिर या नावाने ओळखले जाते.
या मंदिराशेजारीच जननी तिर्थ ही पुष्करणी आहे. पुष्करणीमध्ये शिवमंदिर आहे. ही पुष्करणी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने हजारो दिव्यांनी उजळुन निघाली होती.