इंदापूर : इंदापूर तालुक्यातील रेडणी गावातील शेतकरी नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नगंभीर झाला आहेे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसातच गावातील नागरिकांना हक्काचे पाणी पिण्याचे स्वच्छ मिळावे यासाठी हंडा मोर्चा महिलांनी काढला होता.
नागरिकांचा मूलभूत असणारा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा मार्गी लावण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे सूचना केल्या काही तासांचा अवधी उलटताच रेडणी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा टँकर सुरू केल्याने नागरिकात आनंद व्यक्त होत आहे.
या संदर्भात माहिती देताना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे म्हणाले की,लोकांच्या मूलभूत गरजा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुटल्या पाहिजेत. अशी अपेक्षा सामान्य जनतेचे असते. उन्हाची दाहकता वाढलेली असून रेडणी परिसर हा दुष्काळी 22 गावांपैकी परिसर आहे.
या गावाच्या हद्दीत पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. त्यामुळे रहंडा मोर्च्याच्या द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याचा टँकर उपलब्ध झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.