Sanjay Raut On Ravindra Waikar| मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी विजय मिळवला. तर या निवडणुकीत ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला. यानंतर आता विरोधकांकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे.
येथील लोकसभा मतदार संघातील निकालानंतर मागील काही दिवसांपासून विविध खुलासे होत आहेत. वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणीवेळी मोबाइलचा वापर करून ओटीपीद्वारे ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हंटले की, “वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) retd. पी आय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे.” Sanjay Raut On Ravindra Waikar|
वनराई पोलिस स्टेशनचे पी आई राजभर हे अचानक रजेवर का गेले?
वायकर याना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलिसस्टेशन मधून
बदलण्याचा प्रयत्न झाला.
वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते)
retd.पी आई सातारकर हे वनराई पोलीसस्टेशनात चार दिवसा पासून कायडील करत होते?… https://t.co/Dfq9ClfVah— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2024
“रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही. वादग्रस्तफोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे ऐकले. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणांत बेवड्या आरोपीचे blood sample बदलून क्लीनचीट देणारे हेच लॅबवाले आहेत! लॅब गृह खात्याच्या अंतर्गत येतात,” असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. Sanjay Raut On Ravindra Waikar|
ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही.
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत म्हंटले की, “ईव्हीएम अनलॉक करण्यास ओटीपीची आवश्यकता लागत नाही. ईव्हीएम यंत्र कशाशीही जोडले जात नाही. निवडणूक कर्मचारी गुरव यांचा तो स्वत:चा मोबाइल आहे. त्यांना तो ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आम्हीही याचा अंतर्गत तपास करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा :