नवी दिल्ली – काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक झाल्याने राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. मेवाणी यांना बुधवारी रात्री गुजरातमधील पालनपूर शहरातून आसाम पोलिसांनी अटक करून पहाटे विमानाने आसामाला नेले, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसाम पोलिसांनी मेवाणी यांना पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या ट्विटवरून आपल्या ताब्यात घेतले आहे.
Modi ji, you can try to crush dissent by abusing the state machinery.
But you can never imprison the truth.#DaroMat #SatyamevaJayate pic.twitter.com/Qw4wVhLclH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2022
यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर चांगलंच समाचार घेतला आहे. दरम्यान त्यांनी मोदींना लक्ष करत “लोकशाहीविरोधी” आणि “संवैधानिक” असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंतोषाला “चिरडण्याचा” प्रयत्न करत असून ते सत्य कधीच कैद करू शकत नाहीत. असे एका ट्विटवरून म्हंटले आहे.
मेवाणी यांच्या अटकेवर टीका करताना राहूल गांधी म्हणाले की, ज्या लोकांनी मेवाणी यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांचा हा अपमान आहे. “मोदीजी, तुम्ही राज्य यंत्रणेचा गैरवापर करून असंतोष चिरडण्याचा प्रयत्न करू शकता. पण तुम्ही सत्याला कधीच कैद करू शकत नाही,” राहूल गांधींनी ट्विटरवर “#डरोमत आणि “#सत्यमेवजयते” हॅशटॅग वापरून म्हटले आहे.