सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्याच्या पश्चिम खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुरंदरच्या काही ग्रामीण भागातील पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आता जमिनीची मशागतिला सुरुवात होणार
असल्याने शेतकरी राजा सुखावला असल्याचे पाहावयास मिळते आहे तर सासवड शहरांमध्ये मान्सून दाखल होण्या आधिच मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोट सुरू होते.
दिवे घाटातील धबधबे सुरु झाल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले तर दिवेघाटात मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरती पावसाने राडारोडा आला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
भिवरी येथे अडीच ते चार पर्यंत आस्करवाडी च्या बाजूने मोठा पाऊस झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे सुरू होतील अंदाजे दीड ते दोन तास चाललेल्या पावसात संपूर्ण भात कचरे व ओढे नाले दुथडी भरून वाहत होते शेतीसाठी हा पूरक पाऊस असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सरपंच संजय कटके, सामाजिक कार्यकर्ते सोपान कुंजीर, नवनाथ येवले, यांनी दिली.
झेंडेवाडी येथील परिसरात तीनच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत अमराई ओढ्याला मोठ्याप्रमाणावर पूर आला होता त्यामुळे दगडी तलाव भरला असून या पावसाने गावातील रस्त्यावर पाणी वाहून घराचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर बाजूच्या टेकडीचे दगड माती रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे या पावसामुळे परिसरातील शेतकरी समाधानी असल्याची माहिती उद्योजक अजित गोळे यांनी दिली.
सोनोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अंजीर उत्पादक शेतकरी मात्र धास्तावले आहेत परंतु शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस पूरक ठरेल तर या पावसाने आबा ओढा दुथडी भरून वाहत होता.
असे पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गणेश मोरे यांनी सांगितले.नारायणपूर भिवडी परिसरामध्ये पावसाने मात्र सुरळीत हजेरी लावली असल्याचे नारायणपूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी सांगितले.