मुंबई : भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता पुन्हा भाजपशी जुळवून घ्या अशी साद शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. तर भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्याचं चित्र आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सत्तांतराचे संकेत देणारं एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..
हीच ती वेळ !!!
😊😊😊
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2021
केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाच्या ससेमिऱ्याला कंटाळून सरनाईक यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्याचं समजत. यावरून भाजपनेते प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईक यांच्या पत्राकडे उद्धवजिंनी मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पहावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे,
त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा…!!@BJP4Maharashtra pic.twitter.com/majoP3dQod— Prasad Lad (@PrasadLadInd) June 20, 2021
प्रताप सरनाईक यांच्या पत्राकडे उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पहावे, असा सल्ला लाड यांनी दिला. त्याचवेळी हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असल्याचंही म्हटलं.