नवी दिल्ली – प्रसार भारतीची स्वायत्ता जपली जाईल अशी ग्वाही नवे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या संस्थेला कायद्याद्वारे स्वायत्तता देण्यात आली आहे. येथील दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रसार भारतीचे काम सुरळीत चालावे अशी आमची इच्छा आहे. त्यांनी नवीन कार्यक्रम सादर करून प्रसारणाला नवीन आयाम द्यावा अशी अपेक्षा जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रसार भारतीकडून आकाशवाणी आणि दुरदर्शनचे नियंत्रण केले जाते. या दोन्हीं संस्थांनी आपली विश्वासर्हता जपली आहे त्याबद्दल जावडेकर यांनी कौतुगोद्गार काढले. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी डीडी भारतीला प्रमोट करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली. सरकारने डीडी न्युजला 17 डीएसएनजी व्हॅन्स दिल्या आहेत. त्याद्वारे एचडी दर्जाचे वृत्त संकलन करणे दूरदर्शनाला शक्य होईल असेही ते म्हणाले.