नवी दिल्ली: अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीबाबत ट्वीटद्वारे प्रश्न विचारला आहे. प्रकाश राज यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये प्रकाश राज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रकाश राज यांनी ट्वीट केले, “प्रिय पंतप्रधान, राष्ट्रीय नोंदणीकृत बेरोजगार, संकटातले शेतकरी … शिक्षणाशिवाय मुले … बेघर गरीब. ही आपली प्राथमिकता असू नये काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश राज यांच्या ट्विटवर बरीच लोक कमेंट करत आहेत आणि आपला अभिप्राय देत आहेत. यापूर्वी सुद्धा प्रकाश राज यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटसह त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक सुरू आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना प्रकाश राज यांनी लिहिले की, “आम्ही तुम्हाला आव्हान देत आहोत, तुम्ही संविधान ठार करण्यापूर्वी किती लोकांना ठार कराल.”
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभर निषेध तीव्र होत आहे जनतेबरोबरच सेलिब्रिटी नागरिकत्व कायद्यास आपला विरोध नोंदवित आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरही निदर्शने करण्यात आली होती, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला होता.