नगर – शहरासह उपनगरात भुरट्या चोऱ्या, रात्रीच्या वेळी लुटमार, चैनस्नॅचिंग, घरफोड्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत चोऱ्या थांबण्याबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने शहरात रात्रदिंवस गस्त घालण्याचे ठरविले असून त्यासाठी 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
त्यांना जीपीएससह 10 दुचाक्या दिल्या जाणार आहेत. भुरट्या चोऱ्या, घरफोड्यांबाबत पोलीस प्रशासनाने परिसरात गस्त घालावी याबाबत अनेक नगरसेवकांनी निवेदने दिली होती. याची दखल घेत पोलीस प्रशासनाने शहरात रात्रदिवस गस्त घालण्यासाठी 40 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना जीपीएस सह 10 दुचाक्या दिल्या जाणार आहेत. यामध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे 20 कर्मचारी, पोलीस मुख्यालयाचे 20 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तोफखाना पोलीस ठाण्याला 5 दुचाक्या, कोतवाली 4 दुचाक्या, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याला 1 दुचाकी दिली जाणार आहे.