पिंपरी – महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके यांवर हे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल काढण्यात आल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हे कारण देऊन पालिकेच्या माध्यमिक विभागाने महापालिकेच्या शाळेतीलच गोर-गरीब विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यास नकार दिला होता. याबाबत पुन्हा चर्चा झाली असून पालिकेच्या विद्यार्थ्यांना यावर्षी बक्षीस रक्कम न देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र खासगी शाळा आणि महाविद्यालयातील 5 हजार 141 गुणवंत विद्यार्थ्यांना नागरवस्ती विभागातर्फे तब्बल सव्वा नऊ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील जे विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत 85 ते 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवितात. त्यांना अनुक्रमे 50 हजार आणि 1 लाख रुपये अशी ठराविक रक्कम माध्यमिक विभागामार्फत बक्षीस म्हणून देण्यात येते. मात्र, गतवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके यांवर हे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल काढण्यात आल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 150 इतकी झाली आहे.
हे कारण देऊन पालिकेच्या माध्यमिक विभागाने महापालिकेच्या शाळेतीलच गोर-गरीब विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यास नकार दिला आहे. खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ही तोंडी, प्रात्यक्षिके यांवर हे अंतर्गत मूल्यमापन करून गुण देण्यात आले होते. मात्र त्यानां बक्षीसाची रक्कम देण्यात आली. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी बक्षीसाची रक्कम ही पालिकेच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी असते.
शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांना विचारले असता ते म्हणाले, नागरवस्ती विभागाची आणि माध्यमिक विभागाची योजना वेगळी आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिके यांवर हे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल काढण्यात होता. लाखाचे मानकरी विद्यार्थ्यांची संख्या 150 आहे. त्यामुळे या वर्षी बक्षीस देण्यात येणार नाही. आर्थिक वर्ष संपत आले असून आगामी वर्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस नक्की देण्यात येईल.