नाशिक – राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे तोही एक मोर्चाचं आहे. महाराष्ट्रात असलेले विषय अत्यंत गंभीर आहेत. छत्रपती शिवरायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले अशा महापुरूषांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून होतोय त्याच समर्थन सरकार करतंय याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का ? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी १७ तारखेला महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चाबाबतची माहिती दिली. या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनास सरकार आडकाठी आणू शकता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राष्ट्रीय प्रवक्त्याने केलेल्या विधांवरून तुम्ही तुमच्या प्रवक्तांवर कारवाई करायला हवी होती तुम्ही ती केली नाही मग आम्ही मोर्चा काढणारच असं देखील राऊत यावेळी म्हणाले. आम्ही फक्त नेतृत्व करतोय परंतु हा जनतेचा मोर्चा आहे. मला पूर्ण खात्री आहे,आमच्या या १७ तारखेच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
माहाराष्ट्राचा अपमान सातत्याने होतोय सत्ताधारी तोंडाला कुलुप लावून बसलेत परंतु जनतेने कुलूप लावलेले नाही जनता बोलले. १७ तारखेला जनता गर्जना करेल आणि त्या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जातील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक यावेळी मोर्चात सहभागी होतील अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.