बारामती -बारामती शहर व तालुक्यात चार दिवसांपासून जनता कर्फ्यू सुरू आहे. करोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला दिसून येत नाही. अजून चार दिवसांनी जनता कर्फ्यूचा इफेक्ट जाणवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबावे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
डॉ. खोमणे म्हणाले की, करोना रूग्णांच्या संपर्कातील शहर व तालुक्यात 112 संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जनता कर्फ्यू सुरू असताना देखील प्रादुर्भाव वाढल्याने बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
त्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यानंतर करोनाची खरी परिस्थिती समजेल. नागरिकांनी विनाकारण रस्त्यांवर गर्दी करू नये. असे आवाहन त्यांनी केले आहे.