Pashupati Paras । बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) जागावाटपानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या जागावाटपावर नाराज झालेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष पशुपती पारस यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिलाय. आज पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी भाजपवर आरोप करतआपल्यावर वैयक्तिकरित्या अन्याय झाल्याचे म्हटले.
मी पंतप्रधान मोदींचा आभारी Pashupati Paras ।
पशुपती पारस यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या निर्णयावर आपली नाराजी बोलून दाखवली.यावेळी बोलताना पारस यांनी,“मी समर्पण आणि निष्ठेने एनडीएची सेवा केली, परंतु वैयक्तिकरित्या माझ्यावर अन्याय झाला. आजही मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. मला जेवढे बोलायचे होते ते मी बोललो आहे. पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत बसून भविष्यातील राजकारण ठरवू. असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
पारस यांनी पीएम मोदींना पत्र पाठवले Pashupati Paras ।
पशुपती पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात, “सर, मी तुम्हाला कळवू इच्छितो की काही अपरिहार्य कारणांमुळे मी मंत्रिपरिषदेचा तात्काळ राजीनामा देत आहे. यावेळी, मंत्रिपरिषदेचा सदस्य म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.असे लिहिले आहे.
एनडीएने काल बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली होती. यामध्ये पारस यांचा पुतण्या चिराग पासवान याला प्राधान्य देण्यात आले. लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) पाच जागा देण्याची घोषणा करण्यात आली.लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात फूट पडली होती.
एलजेपीच्या सहापैकी पाच खासदार पारस गटात सामील झाले. एवढेच नाही तर पशुपती पारस यांना मोदी मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले.त्यानंतरही चिराग पासवान सक्रिय राहिले आणि आता एनडीएमध्ये समीकरणे बदलली आहेत. यामुळे संतापलेल्या पारस यांनी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा
बिहारमध्येही काका-पुतण्याची खेळी! जागावाटपातून पुतण्यानेच केलं काकाला out ; वाचा जागेचे समीकरण