परभणी (प्रतिनिधी) – मराठवाड्यातील प्रस्तावित परभणी ते मनमाड दुहेरीकरण गुंडाळणाऱ्या केंद्रातील सरकार आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या जाहीर निषेध करत हा प्रकार म्हणजे मराठवाड्यातील जनतेला रेल्वे सुविधा पासून दूर ठेवण्याचा हेतू असल्याची संतप्त प्रतिक्रिया मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने व्यक्त केली आहे.
काल लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या परभणी-मनमाड दुहेरीकरणाला नकारार्थी विधानाचा आज संपूर्ण मराठवाड्यातून प्रवाशी जनते मध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. विशेषतः मराठवाड्याला कधी न्हवे ते रेल्वे राज्यमंत्री पद आहे आणि ते असताना दुहेरीकरण रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
दानवेसाहेब मंत्रीपदवर असल्याने या भागातील जनतेला भरभरून मिळेल असे वाटले होते, परंतु तसे होत नाही. दमरे (दक्षिण-मध्य रेल्वे) ची नेहमीच मराठवाड्याला साप्तन वागणूक राहिली आहे. दमरेचा तेलंगणा-आंध्र या भागात रेल्वे प्रकल्पाचे अनेक कामे होत असताना अधिकारी जाणीवपूर्वक मराठवाडा बाबत नकारत्मक रिपोर्ट देऊन मराठवाड्याला काही मिळणार नाही अशी व्यवस्था करून ठेवत आहे असा आरोप संघटनेने केला आहे.
परभणी-मनमाड मार्गावर 162 टक्क्याने वाहतूक होत असताना या भागात वाहतूक नाही, प्रवाशी नाही, उत्पन्न नाही असा रीपोर्ट हास्यस्पद आहे तरी सरकारने आपले निर्णय मागे घ्यावा आणि परभणी-मनमाड मार्गाचा दोहेरीकरणाला मंजुरी देऊन तत्काळ निर्माण करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन सोबत रेल रोको आंदोलन उभारण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा. सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, रूस्तुम कदम, डाॅ. राजगोपाल कालानी, रवींद्र मूथा, कादरीलाला हाशमी, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, ओंकार सिंग ठाकुर, दयानंद दीक्षित, वसंत लंगोटे यांनी दिला आहे.