कराड – भारतीय स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. मौलाना आझाद, राणी लक्ष्मीबाई, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव या महान व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा देशाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असून, स्वातंत्र्यानंतर देशाला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले, असे मत माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मलकापूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आ. पृथ्वीराज चव्हाण खा. श्रीनिवास पाटील, आ. अरुण लाड, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीय उदयसिंह पाटील, क्रांतीवीर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, भरत पाटील, सुनिल चव्हाण, विद्याताई थोरवडे, गितांजली थोरात, कर्नल अर्जुन शिणगारे, नगराध्यक्षा निलम येडगे, राजेंद्र यादव, कमल कुराडे, नंदा भोसले, प्रशांत चांदे आदींची उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देवून कृषि क्रांती घडवून देशाला सुजलाम-सुफलाम बनविले. तसेच माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी “गरीब हटावो’चा नारा देवून देशातील गरीबीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केलेल्या आहेत. तसेच स्व. राजीव गांधी यांनी संगणक क्रांती घडवून या देशाला आधुनिक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसित बनविले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशामध्ये आर्थिक क्रांती आणून देशाला आर्थिकदृष्ट्या मजबुत केले आहे. अशा महान कॉंग्रेस पक्षाची विचारधारना असणाऱ्या व्यक्तींना देशासाठी आपले आयुष्य समर्पित केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, मलकापूर पालिकेने आनंदराच चव्हाण यांचे व्यापारी संकुलाला दिलेले नाव स्तुत्य उपक्रम आहे. कै. आनंदराव चव्हाण यांनी देश पातळीवर भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत नेहरु यांच्या मंत्रिमंडळात आपल्या कामाचा ठसा उमटवून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच स्व. प्रेमलाताई चव्हाण काकींनीही देश व राज्य पातळीवर आपल्या कामाच्या माध्यमातून जनमाणसामध्ये प्रतिमा उंचावली आहे. या कुटूंबाबद्दल मलकापूर नगरपरिषदेने होती घेतलेल्या विविध योजना या स्वागताहार्य आहेत.
कार्यक्रमादरम्यान शहरामधील स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांसह आजी-माजी सैनिकांचा व शासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या युवक-युवतींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, अमृत महोत्सवाचे समारोपाच्या कार्यक्रमाअंतर्गत लक्ष्मीनगर येथे अमृत वाटीका वृक्षारोपन कार्यक्रमात देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच 14 रोजी विठ्ठलदेव हौसिंग सोसायटीत स्वा. भास्करराव शिंदे सांस्कृतिक भवन व उद्यान या इमारतीत शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी, नागरीक, महिला बचत गट, युवक मंडळे, जेष्ठ नागरिक यांनी वेगवेगळ्या विभागामध्ये पंचप्रण शपथ देण्यात आली.