नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान चे संबंध संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे मंत्री तर सोडा अधिकारी देखील एकमेकांच्या देशामध्ये भेटीसाठी जात नाहीत परंतु आता तब्बल 12 वर्षानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे आज 4 मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. गोव्यात होणाऱ्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.
कोण आहेत बिलावल ?
बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून बिलावल यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा भारत दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत. मात्र हे मंत्री आपल्या वादग्रस्त विधानामुळे देखील चर्चेत आहे. त्यांनी आजवर अनेकदा भारताविरोधात कडव्या शब्दात टीका केली आहे.
भारता विरोधात केले होते वादग्रस्त विधान…
2014 मध्ये, काश्मीर मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ च्या कार्यकर्त्यांना सांगितले, ‘मी संपूर्ण काश्मीर परत घेईन. मी भारतासाठी एक इंचही सोडणार नाही, कारण काश्मीर फक्त पाकिस्तानचे आहे. पाकिस्तानातील इतर राज्यांप्रमाणे काश्मीरही आपले आहे’. असे वादग्रस्त बिलावल यांनी केले होते.
दरम्यान, 2002 मध्ये बिलावल यांच्या आई आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टो या देखील भारतात आल्या होत्या. त्यावेळी बेनजीर भुट्टो यांनी भारताचे तात्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांची भेट घेतली होती. तर 2012 मध्ये बिलावल यांचे वडिल आसिफ अली जरदारी हे भारतात आले होते.