पुण्याला मल्लखांबचा दोन शतकांचा इतिहास असून ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पेशव्यांनी या खेळाला राजाश्रय दिला होता. पुणे हे मल्लखांबचे माहेरघर आहे. पुण्यात जी प्रशिक्षण केंद्र सध्या सुरू आहेत त्यातून अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू घडविले आहेत.
आजवरचा इतिहास पाहता कुस्ती, हॉकी यासारख्या भारतीय खेळांचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला आहे. तरी मल्लखांबसारख्या अस्सल भारतीय क्रीडाप्रकाराचाही अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत समावेश झाला तर भारताला ऑलिंपिंकमध्ये घवघवीत यश मिळेल आणि पदकांचीही लयलूट करता येईल. कुस्ती, हॉकी, बॅडमिंटन या खेळांखेरीज तिरंदाजी, टेनिस, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग इत्यादी खेळांमध्ये आवश्यक असलेले गुण म्हणजे एकाग्रता, क्षमता, लवचिकता हे मल्लखांबाच्या सरावामुळे क्रीडापटूंना फायद्याचे ठरू शकतात.
इ.स. 1936 मध्ये हिटलर समोर मल्लखांबाची प्रात्यक्षिके झाली होती. तेव्हा मल्लखांब का क्रीडाप्रकार उभारी घेईल असे वाटले होते. तरी अजूनही मल्लखांबला पाहिजे तसे सांनेरी दिवस आलेली नाही. या क्रीडाप्रकारला आंतराष्ट्रीयपातळीवर नेण्याचे काम अनेकजण करीत आहेत.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी कुस्ती, तिरंदाजी, टेनिस या खेळांमध्ये वैयक्तिक तर हॉकीसारख्या खेळामध्ये सांघिक पदके पटकाविली आहेत. मल्लखांबासारख्या भारतीय क्रीडाप्रकाराचाही समावेश ऑलिम्पिकमध्ये झाल्यास सोन्याचे दिनू येतील आणि पदक तक्त्यात वाढ होईल. तसेच भारताचे ऑलिम्पिक पदकक्रमवारी तक्त्यातील स्थानही उंचावेल आणि भारतीय क्रीडाक्षेत्राला नवी झळाळी मिळेल.
श्रीनिवास हवालदार
मल्लखांब प्रशिक्षक