बनिहाल – नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला शुक्रवारी येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. त्यांनी या यात्रेच्या उपक्रमाचे कौतुक केले असून त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा कॉंग्रेस नेत्याची प्रतिमा बदलण्यासाठी नाही, तर परिस्थिती आणि देशातील वातावरण बदलण्यासाठी काढली जात आहे.
अब्दुल्ला म्हणाले की, देशाच्या प्रतिमेची जास्त काळजी असल्याने आम्ही या यात्रेत सामील झालो. मोदी सरकारच्या अल्पसंख्याकांविषयीच्या भूमिकेवर टीका करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हे सरकार अरब देशांशी मैत्री करत असेल पण वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारमध्ये देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांचा एकही प्रतिनिधी नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडे एकही मुस्लिम संसद सदस्य नाही. लोकसभा किंवा राज्यसभेत भाजप मध्ये मुस्लिम समुदायाचा सदस्य नाही यावरून त्यांची वृत्ती दिसून येते.
कलम 370 रद्द करण्याबाबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले, आम्ही कलम 370 पुनर्स्थापित करण्यासाठी न्यायालयात खटला लढणार आहोत. जम्मू-काश्मीरमधील जनतेने निवडणुकीसाठी भीक मागावी, अशी सरकारची इच्छा असल्याचे उमर म्हणाले.आम्ही भिकारी नाही आणि आम्ही भिक मागणार नाही,असेही ते म्हणाले.