बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी सामाजिक तसेच राजकीय विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आघाडीवर असतात. अर्थात, राजकारणावर बोलण्याबाबत फारसे कुणी तयार नसते.
अगदीच माध्यमांनी विचारणा केली किंवा एखादा राजकीय विषय समाजकारणावर परिणाम करणारा असेल तरच ही मंडळी भाष्य करतात. पण विद्या बालन आणि सैफ अली खान हे दोन कलाकार राजकारणावर भाष्य करणे कटाक्षाने टाळतात.
View this post on Instagram
याबाबत या दोघांनीही अलीकडेच दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. विद्या म्हणते, मुळात नायक-नायिकांनी प्रत्येक मुद्दयावर बोलण्याची अपेक्षाच का ठेवली जाते हेच मला कळत नाही. जर आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी पुरेशी माहिती नसेल तर आम्ही त्यावर बोलणे टाळतो आणि ते योग्यही आहे.
त्यात गैर वाटण्याचे किंवा आक्षेप असण्याचे कारणच काय? चित्रीकरणा दरम्यान माझ्यासोबत 200 लोक काम करत असतात; माझ्या एखाद्या विधानामुळे त्यांच्यावर काही परिणाम झालेला मला आवडणार नाही.
View this post on Instagram
त्यामुळेच मी “नो कमेंटस्’ची भूमिका घेते. सैफ अली खान सांगतो की, मी आत्ता आत्ता राजकारणातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करु लागलो आहे.
अशा प्राथमिक किंवा नवख्या अवस्थेत असताना किंवा अपुरी माहिती असताना एखाद्या घटनेबाबत आपले मत व्यक्त करणे चुकीचे आहे. भारतात राजकीय मुद्दावर बोलल्यानंतर त्याचे चुकीचे अर्थही काढले जातात. त्यामुळेच मी यापासून लांब राहतो.