चेन्नई – बंगालच्या उपसागरातून २ डिसेंबर रोजी उदयास आलेले मिचाँग चक्रीवादळ ( Cyclone Michong ) ५ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश ( Andhra pradesh ) किनारपट्टीवर धडकले. त्याआधी या वादळाने चेन्नईत बराच विध्वंस केला होता. येथे एका दिवसात सर्वाधिक ५० सें.मी. पाऊस झाला होता.
गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे अनेक भाग पुरात बुडाले आहेत. अनेक भागात ७२ तास वीज नाही. इंटरनेट बंद आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे.
तामिळनाडूतील वादळामुळे ( Tamilnadu wadal ) राज्यात २ दिवसांत ३ महिन्यांचा पाऊस पडला. चेन्नई शहर पाण्यात बुडाले असून त्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सीएम एमके स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांना पत्र लिहून ५०६० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. मिचाँग चक्रीवादळ बुधवारी तेलंगणात पोहोचल्याने कमकुवत झाले. दुसरीकडे चक्रीवादळामुळे ओडिशात अद्यापही पाऊस पडत आहे.