अहमदाबाद : निसर्ग वादळ बुधवारी आदळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वलसाड आणि नवासरी जिल्ह्यातील किनारावर्ती 47 गावातून सुमारे 20 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे किनारावर्ती भागातील सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत असले तरी, हे वादळ गुजरात किनारपट्टीवर येण्याची शक्यता धुसर असल्याचे सांगण्यात आले.
हे वादळ जरी गुजरातला धडकणार नसले तरी या भागात जोरदार वादळी वारे वाहू शकतील. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नवासरी आणि वलासाडमधून 20 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
वलसाडमध्ये किनारावर्ती 35 गावांमध्ये सुमारे 10 हजार जण राहतात. त्यांना निावारागृहात हलवण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी आर. आर. रावळ यांनी सांगितले. तर जवळच्या नवासरीमध्ये 12 गावांत दहा हजार 200 लोकांना हलवण्यात आले आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आर्द्र अग्रवाल यांनी सांगितले.
नवासरीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 14 टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. आणखी पाच टीम हवाई मार्गे पाठवण्यात आल्या आहेत.