नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर पॅकेजचा आढावा गेतला. यात बॅंकांमार्फत लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगासांठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्यानुसार बॅंकांनी या क्षेत्राला आत्तापर्यंत 2 लाख 5 हजार 563 कोटी रूपयांचे कर्ज मंजुर केले आहे अशी माहिती अर्थमंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एकूण तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज वितरीत केले जाणार आहे.
त्यापैकी आत्ता पर्यंत प्रत्यक्षात 1 लाख 52 हजार कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. हे कर्ज पाच वर्षात फेडायचे असून त्यातील पहिल्या एक वर्षासाठी कर्जदाराकडून कोणतीही परतफेड आकारली जाणार नाही. या योजनेअंतर्गत 31 मार्च 2021 पर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.