गुवाहाटी : ईशान्य सीमावर्ती रेल्वेने प. बंगालमध्ये जाणाऱ्या सर्व 16 रेल्वे रद्द केल्या आहेत. सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात अनेक स्थानकांत तीव्र निदर्शने सुरू आहेत.काही स्थानके पेटवून देण्यात आली आहेत. तयामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या रेल्वे बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
प. बंगालमधील परिस्थिती सुधारणा होईपर्यंत या रेल्वे बंद राहतील, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिाकारी शुभानन चंद यांनी सांगितले. प. बंगालमंध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रेल्वेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बंगालकडे जाणाऱ्या 16 गाड्या रद्द केल्या आहेत. एकूण किती नुकसान झाले याची पहाणी सुरू आहे. तसेच रेल्वे सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू आहे ,असे चंद म्हणाले. अगरताळा सीलडाह कांचनगंगा एकगसप्रेस आणि अगरताळा बंगळुरू हमसफर एक्सप्रेस सोमवारी रद्द करण्यात आल्या. या दोन्ही रेल्वे प. बंगालमधून प्रवास करतात.
दरम्यान गुवाहाटीतील संचारबंदी सोमवारी शिथिल करण्यात आली. त्यामूळे बाजारपेठ उघडली होती. रस्त्यावर वाहतूक होती. दिब्रुगढमध्येही संचारबंदी उठवण्यात आली. कामरूप मेट्रोसह राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. निदर्शनावेळी हिंसाचार करणाऱ्या 180 जणांना पोलिसांनी अद्याप अटक केलीे आहे.