नाशिक – शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नाशिक येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांसोबत आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असा शब्द त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
आदित्य ठाकरेंनी जिल्ह्यातील पांढुर्ली येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. कोणीही धीर सोडू नका, उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवलंय, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली. गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले नाही. पण आम्हाला राजकारण करयाचे नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत आम्ही विधानसभेत आवाज उठवू असा शब्द शेतकऱ्यांना दिला. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मदत सोडा, पण साधं पाहणीसाठीही मुख्यमंत्री आले नाहीत.
आत्ताच धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत! pic.twitter.com/28Rit6TzfS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022
दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर सोडू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आधार दिला होता. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी धामणगाव, इगतपूरी, येथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा धीर आदित्य ठाकरे यांनी दिली.
वडगाव, ता. जून्नर, जि. पुणे येथील,
अस्मानी संकटाला सामोरं जाताना खचून जाऊन टोकाचे पाऊल उचललेल्या कै.दशरथ केदारे यांच्या कुटुंबाला भेट दिली, धीर दिला. मुलांनी शिक्षण सोडू नका. आम्ही पक्ष म्हणून सोबत आहोतच, पण त्याही आधी माणूस म्हणून तुमच्या सोबत आहोत. pic.twitter.com/u4h1yt5sKN— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022