मुंबई – राज्यात काल 4 हजार 279 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 18 लाख 32 हजार 825 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातला करोनामुक्तीचा दर 94.69 शतांश टक्के झाला आहे.
काल 3 हजार 524 नवीन करोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 19 लाख 35,636 झाली आहे. सध्या राज्यात 52.0 84 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल 59 रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, 49 हजार 580 झाली आहे. राज्यातला मृत्यू दर 2.56 शतांश टक्के इतका कायम आहे.