नवी दिल्ली – एका बाजूला पोलीस निदर्शकांचे स्वागत लाठीमार आणि अश्रुधुराने करत असताना दिल्लीतील एका मस्जिदीने त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करून विविधतेतील एकतेचे दर्शन घडवले आहे. त्याचबरोबर सर्वात मानवता महत्त्वाची असल्याचाही संदेश दिला आहे.
पंजाब आणि अन्य राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीतील अनेक मस्जिदींकडून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. का आणि एनआरसी आंदोलनाच्या वेळी शेतकरीवर्ग आमच्या बाजूने उभा राहिला होता. आता त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची वेळ आहे. असहनशील सत्ताधाऱ्या विरोधात एकता आणि जाणिवेचे हे खरे प्रदर्शन आहे, असे ट्विट महंमद अजमल खान यांनी केले आहे.
अनेक मस्जिदीमध्ये हे जेवण बनवण्यसाठी स्वयंपाकघर बनवण्यात आली आहेत. त्याची व्यवस्था कशी केली जाते याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नदीम खान यांनी दिली आहे. आयोजक हे भोजन त्यांना मोफत देत आहेत.