ठाणे – रेशनधारकांसाठी राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत 100 रुपयांत साखर, तेल, रवा, चणाडाळ देण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात 100 रुपयांचा शिधा 300 रुपयांना विकला जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर ही घटना समोर आली.
दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारने गाजावाजा करीत दिवाळीत गोरगरीबांना 100 रुपयाची रेशन किट (आनंदाचा शिधा) स्वस्त धान्य दुकानात उपब्लध करून दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच गोरगरीब आदिवासी रेशनधारकांकडून 300 रूपयात विक्री होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही हे किट पोहचले नसल्याचे चित्र आहे.