वंदना बर्वे /नवी दिल्ली: लॉकडाऊन शिथिल केलेल्या भागात कारखाने सुरू करण्यापूर्वी कंपन्यांनी सुरक्षेची पूर्ण शहानिशा करून घ्यावी, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. आता काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. अशात, कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवनार नाही, याची कंपन्यांनी काळजी घ्यावी, असा प्राधिकरनाने सल्ला दिला आहे.
लॉकडाऊन अनेक आठवडे चालल्यामुळे आणि या काळात औद्योगिक उत्पादन केंद्रे बंद असल्यामुळे, ह्या काळात कारखान्याच्या संचालकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन केले नसल्याचे शक्य आहे. परिणामी, काही उत्पादन सुविधा, पाईपलाईन, व्हाल्व इत्यादींमध्ये रसायने जमा झाली असण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे कारखाने पुन्हा सुरु झाल्यावर काही धोका निर्माण होऊ शकतो. हीच बाब धोकादायक रसायने आणि ज्वालाग्रही वस्तूंचा साठा असलेल्या ठिकाणीही लागू आहे.
पीओएल टॅंकर, 2010, जे रासायनिक उद्योगांशी संबंधित असतात, त्यांच्या वाहतूक सुरक्षेला अधिक बळकट करणे. धोकादायक रसायनांचे उत्पादन, साठा आणि निर्यात करण्याबाबतचा नियम, 1989 या अन्वये, या उद्योगांसाठी आवश्यक कायदेशीर प्रावधाने केली आहेत.
जर लॉकडाऊन सारख्या प्रक्रिया केल्या नसतील, अशावेळी अनेक ऊर्जास्त्रोतही कारखान्यांसाठी आणि मशिनरीची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. तसेच अवजड यंत्रे आणि उपकरणे यांचे व्यवस्थापन नीट न झाल्यास ती देखील अभियंता किंवा वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकतील.
ज्वलनशील द्रव, बंद वायू, खुल्या तारा, कन्व्हेअर बेल्ट्स आणि स्वयंचलित वाहने याचाही धोका संभवू शकतो. जर सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले नसेल, तर ते अधिक धोकादायक ठरु शकतात.
जेव्हा काही अनपेक्षित घटना घडतात, अशा वेळी त्वरित प्रतिसाद-प्रतिक्रिया देणे आव्हानात्मक असते. त्यामुळे असे धोके कमी करणे आणि सर्व उद्योगांना सुरळीतपणे पूर्ववत सुरु होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
काही अपघात प्रवण विभागांच्या आसपास असलेले आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प अद्ययावत आणि सुरळीत तसेच प्रतिसादासाठी सज्ज आहेत, याची काळजी राज्य सरकारांनी घ्यायची आहे. या प्रकल्पांमध्ये औद्योगिक विभाग आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरळीत आहेत याची खातरजमा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी करायची आहे. तसेच लॉकडाऊन नंतर कारखाना उघडल्यावर सर्व नियमांचे पालन होईल, अशी दक्षता घ्यायची आहे.