पुणे – शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. आता विशेष कारणास्तव म्हणजेच विनंती बदल्यांचे सत्र राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विविध मुख्य कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदल्यांची आवश्यकता आहेत. दरम्यान, “सोयी’च्या ठिकाणी बदल्या व्हाव्यात, यासाठी स्पर्धा लागणार आहे.
करोनामुळे गेल्या सव्वापासून फारशा बदल्या झाल्या नाहीत. यंदा प्रशासकीय कारणास्तव 25 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता 10 टक्के एवढ्या विनंती बदल्या होणार आहेत. 30 ऑगस्टपर्यंत त्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रशासकीय कारणास्तवच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांवर विशेष कारणास्तवच्या बदल्या करण्यात होतील. जे पद रिक्त नाही, त्यावरील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची अन्यत्र बदली करून अशा पदावर विशेष कारणास्तव बदली करता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहेत.
प्रशासकीय बदल्यांमध्ये शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फारशा बदल्या झाल्या नाहीत. भानगडी करणारे अधिकारी, कर्मचारी संबंधित विभागात आहे त्याच पदांवर तळ ठोकून आहेत. दरम्यान, काही चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही अन्यत्र हलवलेले नाही. ज्यांच्या बदल्या करायला पाहिजेत त्यांच्या बदल्याच झालेल्या नाहीत.