नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च नायायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली. ५ सदस्यीय घटनापीठाकडे आज अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. आमदारांची अपात्रता त्यासोबतच शिवसेना कोणाची ? निवडणूक आयोग निर्णय पद्धती या सर्व गोष्टीबाबत आज न्यायालय काय भाष्य करणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आज सुनावणी सुरु झाली आहे.
उद्या १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापुर्वीच कोसळेल.. न्यायदेवता न्याय देईलच
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 26, 2022
अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी ट्विट करत १० दिवसांत राज्यातलं सरकार कोसळेल, असं भाकित केले आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे की,’ “उद्या १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल..न्यायदेवता न्याय देईलच.” असं म्हणत हि सुनावणी उद्धव ठाकरे यांना न्याय देणार असेही म्हटले आहे.