मुंबई – दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विभक्त होण्याची घोषणा केली होती. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. आता अलीकडेच नागार्जुनने या घटस्फोटाबाबत उघडपणे आपले मत सांगितले आहे.
नागार्जुन म्हणतो, ‘माझा मुलगा आनंदी आहे, एवढेच मला दिसत आहे. हा एक प्रकारचा अनुभव त्याला आला. हे देखील अत्यंत दुर्दैवी आहे. आपण त्याबद्दल सतत बोलू शकत नाही. ते आपल्या आयुष्याच्या बाहेर आहे. त्यामुळे मला आशा आहे की हा किस्सा सर्वांच्या आयुष्यातून निघून जाईल.’
काही दिवसांपूर्वी सामंथाच्या वडिलांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर असे वाटले की ते अद्याप त्यांच्या मुलीच्या घटस्फोटाच्या दुःखातून सावरलेले नाहीत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट होती आणि आता ती नाहीये!!! चला तर मग एक नवीन कथा आणि नवीन अध्याय सुरू करूया.’
दोघांची पहिली भेट 2010 मध्ये झाली होती.
सामंथा आणि नागा चैतन्य 2010 मध्ये ये माया चेसावे या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले. लग्नाआधी दोघांनी जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर 6 ऑक्टोबर 2017 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. लग्नाच्या 4 वर्षानंतर 2021 मध्ये दोघांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे वेगळे होण्याची घोषणा केली.
सामंथा आणि नागा चैतन्य यांनी गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला त्यांच्या घटस्फोटाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही आमच्या सर्व हितचिंतकांना सांगू इच्छितो की आम्ही पती-पत्नी म्हणून खूप चर्चेनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एक दशकाहून अधिक काळापासून आमच्या नात्याचा अविभाज्य भाग असलेली मैत्री आमच्यासाठी भाग्यवान आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष बंध असेल.’