नगर – सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार (दि.२) रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात महत्त्वाच्या विषयावर बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयावर चर्चा करुन निर्णय घेत मराठा समाज बांधव निवडणुकीमध्ये हजारो अर्ज भरुणार असल्याचा महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
या वेळी अॅड.गजेंद्र दांगट म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत हजारो मराठा बांधव अर्ज दाखल करणार असून मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला ज्यांनी पाठींबा दिला नाही, अशा उमेदवरांना देखील कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे.
संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण करत आहेत. परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. तसेच जरांगे यांच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून सरकारने आता संघर्षयोध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व समाज बांधवाची देखील एसआयटी चौकशी करावी यांसदर्भात सरकारला इमेल करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी नगर शहर व तालुक्यातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.