नगर – मुलीला स्वत:च्या पायावर उभे करुन तिला कर्तुत्व सिद्ध करू द्या. मुलींच्या लग्नासाठी बाजाराच्या घोड्यावर तिचा लिलाव होऊ देवू नका. मुलगी कर्तुत्ववान, सक्षम व आर्थिक संपन्न झाल्यास तिच्यावर अन्याय करण्याचे धाडस कोणाचे होणार नसल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन हुंडा घेणार नाही व देणार नाही! या विचाराने घेतलेला वधू-वर मेळावा समाजाला दिशा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेवक ऍड. धनंजय जाधव, प्रा. माणिक विधाते, पोपट बनकर, ऍड. महेश शिंदे, माळी महासंघाचे गणेश बनकर, प्रा. सिताराम जाधव,
शेखर होले, नितीन डागवाले, ऍड. सुनिल महाराज तोडकर, मंगल भुजबळ, नगरसेविका वंदनाताई ताठे, जयश्री शिंदे, ज्योती व्यवहारे, संजय फुलसौंदर, प्रयागाताई लोंढे, जयश्री व्यवहारे, राजेंद्र झोडगे, सुभाष गोंधळे, नंदकुमार नेमाने उपस्थित होते.