जामखेड – जामखेड शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर आला असून एकीकडे शहर अस्वच्छतेमुळे परिसरात डासांनी उच्छाद मांडला आहे. शहरात डेंग्यूसदृश साथ असताना जामखेड नगरपरिषदेचे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस डासांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहराच्या अनेक भागांत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच पासिंग अभावी तीन घंटागाड्या पोलीस स्टेशन आवारात धूळखात पडल्या आहेत. अनेक परिसरात सकाळी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात जंतूनाशक फवारणी झाली नसल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने जंतूनाशक औषध फवारणी करून नागरिकांना दिलासा दिला पहिजे.
गेल्या एक वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या योग्य नियोजनामुळे आरोग्य विभागाच्या मार्फत शहरात सकाळच्या सत्रात शहरातील विविध भागासह मुख्य बाजारपेठेच्या मार्गावरील व्यावसायिक, नागरिकांकडील कचरा उचलला जात होता. मगेल्या एक वर्षाच्या काळात पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्यांना बसत आहे.
पूर्वी वेळेत कचरा उचलला जात असल्याने व्यवसाय सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छ असायचा, मात्र सध्या अकरा वाजल्यानंतर कचरा उचलणारा ट्रॅक्टर बाजारपेठेतील मुख्य मार्गावरील कचरा गोळा करण्यास येत असल्याने कचऱ्याची दुर्गंधी तर येतेच शिवाय ट्रॅक्टरने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अनेक दिवसांपासून शहरातील स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
माजी नगरसेवकांची तोंडावर पट्टी
प्रत्येक प्रभागांमध्ये घंटागाडीच्या समस्या आहेत. घाणीचे साम्राज्य वाढले आहे, नागरिक तक्रारी करत आहेत. तरीही अपवाद