पुणे, दि. 16 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या आदेशानुसार, “हर घर तिरंगा’ उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केला जाणार होता. त्यासाठी स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून शहरातील चौका-चौकात पब्लिक ऍड्रेसल सिस्टीम यंत्रणेवर या उपक्रमाच्या जाहिराती वाजविण्यात आल्या. मात्र, 16 ऑगस्ट रोजीही या जाहिराती शहरात अनेक ठिकाणी चालूच होत्या. 15 ऑगस्टनंतर या जाहिराती बंद होणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी सकाळी अनेक भागात जाहिरात सुरूच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
महापालिका प्रशासनाकडून या उपक्रमाची जाहिरात करण्यासाठी पालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरही या उपक्रमाची कॉलर ट्यून लावण्यात आली होती. ही कॉलर ट्यूनही अद्याप सुरूच आहे.