ठिक-ठिकाणी कचरा रस्त्यावर : शहर स्वच्छ सर्वेक्षणाचा उडाला बोजवारा
कचरा टाकणाऱ्यांवर कुठलीच कारवाई नाही
नगर – महापालिकेने नुकतेच शहर स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल 106 कचरा कुंड्या हटविल्याने, शहरासह रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ सर्वेंक्षणाचा बोजवारा उडाला असून मनपा, स्वयंभूला कचरा दिसेना अशीच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
महापालिकेने शहरातील कचरा संकलनाचा तीन वर्षाचा ठेका पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टला दिला असून महापालिका टनामागे 1 हजार 650 रुपये मोजत आहे. त्यात कचराकुंड्यातीलच कचरा स्वयंभू घेवून जात असून रस्त्यावर पडलेला कचऱ्याचे ढीग तसेच साचत आहे. त्यातच स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर कचराकुड्या मुक्त करण्याचा मानस महापालिकेने केल्याने त्यांनी शहरातील 106 कचरा कुंड्या हटविल्याने नागरिक कुंड्याच्या जागी, तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहे. त्यामुळे शहरात ठिक-ठिकाणी कचरा पडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उपनगरातसह शहरातील रस्त्याच्याकडेला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यातच स्वयंभूच्या घंटा गाड्या घराजवळ थांबत नाल्याने नागरिकांनी कचरा रस्त्याच्या व कचराकुड्या असणाऱ्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात घर ते घर कचरा संकलन करण्याची जबाबदारी महालिकेने स्वयंभूवर सोपावली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात स्वयंभूच्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी फिरविण्याची जबादारी स्वयंभूची आहे. मात्र असे न होता काही घंटा गाड्या वेगाणे निघून जात असल्याने नागरिकांना वाहनामागे पळण्याची वेळ येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नागरिकांनी इतरत्र कचरा टाकू नये यासाठी महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक संघ, स्वयंसेवी संस्थाचा बैठका घेवून आपनही स्वच्छतेबाबत प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात येत आहे. जो कोणी ऐकत नसेल व शहर अस्वच्छ करित असेल त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे मात्र कुठली ही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.