मुंबई – दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात वेळेत षटके पूर्ण न झाल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. रोहितच्या नेतृत्वात ही चूक दुसऱ्यांदा घडली आहे.
अशी चूक झाल्यावर संपूर्ण संघाला 6 लाख रुपये किंवा सामना रकमेच्या 25 टक्के रकमेचा दंड यांपैकी जी रक्कम जास्त असते तितका दंड केला जातो.
यंदाच्या स्पर्धेत रोहितला पहिल्यांदा अशी चूक झाल्यावर 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. आता अशीच चूक पुन्हा घडली तर रोहितला 30 लाख रुपयांचा दंड तर होईलच, पण आयपीएल स्पर्धेत एका सामन्याची बंदीही घातली जाऊ शकते.