परभणी – वीजजोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथरीच्या एकतानगर येथे घडली. मोहम्मद अखिल मोहम्मद रहमान अन्सारी (वय 26) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री एकतानगर परिसरात घडली.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केली आहे. रात्रभर मृतदेह रुग्णालयात ठेवल्यावर संतप्त नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर आणून ठेवला आहे. जोपर्यंत महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेहवरती अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पावित्रा नातेवाईकानी घेतला. नागरिकांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.