इंदूर – मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी, अनुपम राजन यांनी म्हटले आहे की राज्यातील मतदानाच्यावेळी काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे अहवाल प्राप्त झाले असले तरी एकूण मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणणारी कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. राज्यातील मतदान प्रक्रिया बहुतांशी सुरळीतपणे आणि शांततेत पार पडल्याची माहितीहीं त्यांनी दिली.
ते म्हणाले की, आम्हाला काही ठिकाणांहून हिंसेच्या बातम्या मिळाल्या असल्या तरी, कोणत्याही गंभीर घटना घडलेल्या नाहीत आणि या घटनांमुळे मतदानावर कोणताही परिणाम झालेला नाही.
मतदान कर्मचाऱ्यांवर हल्ले, किंवा मतदान साहित्याची नासधूस किंवा लुटमारीचा प्रयत्न झाल्याचा अहवाल आतापर्यंत, आम्हाला मिळालेला नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा घडलेली मुरैना येथील घटना, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तिचा निवडणुकीशी संबंध नाही, असे त्यांनी नमूद केले. शवविच्छेदनानंतर एफआयआर नोंदवला जाईल असेही त्यांनी नमूद केले.