जम्मू – केंद्र सरकारने नव्याने जे तीन कृषी विषयक कायदे संमत केले आहेत त्याच्या विरोधात दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरात कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
माजी मंत्री रमण भल्ला यांनी याचे नेतृत्व केले. शहीदी चौकात झालेल्या आंदोलनाच्यावेळी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना भल्ला म्हणाले की, या विधेयकाच्या समर्थनार्थ सरकारकडून भ्रम निर्माण करणारे दावे केले जात आहेत.
त्यांना सत्तेचा अहंकार निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आपला हट्ट सोडून हे तिन्ही कायदे त्वरीत रद्द करावेत आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
या कायद्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देणारी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याची प्रथाच रद्द होईल आणि शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या आणि दलालांच्या दयेवर राहावे लागेल. मोदींनी देश श्रीमंतांकडे गहाण टाकला आहे असा आरोपही त्यांनी केला.