नवी दिल्ली – प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे झालेल्या डिजीटल बदलांमुळे गेल्या 9 वर्षात देशात आर्थिक समावेशकतेमध्ये आमुलाग्र बदल झाला असल्याचं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. जनधन योजनेला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या बोलत होत्या. या द्वारे 50 कोटीहून अधिक जनधन खाती उघडून त्यांना बॅंकिंग प्रणालीमध्ये आणण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं.
जनधन खातेधारकांमध्ये 56 टक्के खाती महिलांची असून 67 टक्के खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. या योजनेअंतर्गत 2 लाख 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. जनधन खातेधारकांना 33 कोटीहून अधिक रुपे कार्ड वितरित करण्यात आली आहेत. यातील 6 कोटी 26 लाख लोकांना विविध सरकारी योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.