Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (narendra modi) निशाणा साधत “मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी चोवीस तास काम करत’ असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी भारत माता की जय म्हणण्याऐवजी अदानी की जय असे करीत आहेत असे ते म्हणाले.
गरीब, शेतकरी, मजूर हीच खरी ‘भारत माता’ आहे आणि जेव्हा या घटकांचा सहभाग देशातील विकासात निश्चित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत मातेची ‘जय’ होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांना दोन ‘हिंदुस्थान’ बनवायचे आहेत, एक अदानीसाठी आणि दुसरा गरिबांसाठी, असा आरोपही त्यांनी केला. गेल्या अनेक महिन्यांपासून कॉंग्रेस पक्ष अदानी प्रकरणावरून मोदींवर निशाणा साधत आला आहे. अदानीचे अनेक घोटाळेही त्यांनी उघडकीला आणले आहेत.
देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असा आग्रह धरताना राहुूल गांधी म्हणाले की, मोदी काहीही झाले तरी जात जनगणना करणार नाहीत. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षच हे करू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले.