World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला आहे.
टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. केएल राहुल, विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजांला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर फार काळ टिकता आलं नाही.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 240 धावांच्या आधीच रोखलं आहे. भारतीय संघ 50 ओव्हरमध्ये 240 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 रन्सचं टार्गेट मिळालं आहे. फलंदाजांनी निराश केल्यानंतर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आता विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवायचे असेल टीम इंडियाच्या गोलंदाजांनाऑस्ट्रेलियानं संघाला लवकरात लवकर गुंडाळवं लागेल.
टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला असून कांगारू संघासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून केएल राहुल यानं 107 चेंडूत एका चौकारासह 66 धावांची खेळी केली. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. रोहित 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा करून बाद झाला. सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या. भारतासाठी या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. रोहित, कोहली आणि राहुलला चांगली सुरुवात मोठ्या डावात करता आली नाही. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार मोठ्या क्षणी अपयशी ठरले. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर आहे. त्याच्याकडून धोकादायक गोलंदाजीची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दरम्यान, भारतीय संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली. यामध्ये भारताला 2 वेळा विजय आणि एकदा पराभव स्विकारावा लागला.1983 मध्ये, भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याने वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते.
यानंतर 2003 मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताला ऑस्ट्रेलियाकडून 125 धावांनी पराभव पत्करावा लागला.त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेला हरवून भारताने 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर आज भारत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.