जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीमुळे पुलवामा हल्ला घडल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. तसेच पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्यास सांगितल्याचेही मलिकांनी सांगितले. या विधानामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, “पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. पण गृह मंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाहीत. ही मोठी चूक केल्याने 40 जवानांना जीव गमवावा लागला. वेळीच त्यांना विमानसेवा पुरवली असती, तर हे घडले नसते. पुलवामा घटनेनंतर मोदींसोबत संवाद साधला असता त्यांनी गप्प राहण्यास सांगितले. या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल,” असे सरकारचे धोरण होते असा मोठा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. पुलवामा हल्ल्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.
.@narendramodi जी, पुलवामा हमला और उसमें 40 जांबाजों की शहादत आपकी सरकार की गलती से हुई।
अगर हमारे जवानों को एयरक्राफ्ट मिल जाता तो आतंकी साजिश नाकाम हो जाती।
आपको तो इस गलती के लिए एक्शन लेना था और आपने ना सिर्फ इस बात को दबाया पर अपनी छवि बचाने में लग गए।
पुलवामा पर सत्यपाल… pic.twitter.com/6qBVTpMqtk
— Congress (@INCIndia) April 14, 2023
मलिक यांचा व्हिडिओ ट्वीट करत काँग्रसने मोदी सरकारवर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना विमान मिळाले असते, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणे अपेक्षित होते. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलेच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे”, असे काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पुलवामा हल्ला
14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. स्फोटकांनी भरलेली कार या जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर आदळून हे हत्याकांड घडवण्यात आले होते. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.